मूलच्या जनतेचा श्वासच हिरावण्याचा प्रयत्न!
*मालधक्का इथून हटलाच पाहिजे!* जनतेला , प्रशासनाला अंधारात ठेवून असे काम कसे करु शकतात? * जनतेचे भविष्य अंधाराच्या दिशेने ....!* * मालधक्का हटवावाच लागेल अन्यथा.......* .......अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारणार दीपक देशपांडे मूल. अंदाजे सुमारे दिडशे वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मूल रेल्वे स्टेशन परिसरातील माल धक्काचे काम थांबवुन आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी माल धक्काच स्थलांतरीत करण्याची मागणी मूल येथील मार्निग गृपच्या वतिने करण्यात आली असुन रेल्वे प्रशासनाने काम बंद करुन स्थलांतरीत न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा मार्निंग गृपच्या वतिने आयोजीत पत्रकार परिषदेत दिला आहे. मूल येथील पत्रकार संघाचे सभागृहात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत मार्निंग ग्रुपचे सदस्य जिवन कोंतमवार, अॅड. अश्वीन पॉलीकर, हिरेन गोगरी म्हणाले की, मूलच्या नागरीकांना फिरायला जाण्यासाठी कर्मविर महाविद्यालयाचे एकमेव पटांगण आहे, सदर पटांगणाला लागुन प्रादेशिक,वनविकास महामंडळ आणि बफर क्षेत्राचे मोठे जंगल असुन यापरिसरामधून वन्यप्राण्याची मोठया प्रमाणात रेलचेल असते, असे असतानाही रेल्वे प्रशा