*बोलतात सगळेच पण सोबतीला कोण?
*अजब नगराची गजब गाथा* दीपक देशपांडे. * व्यावसायिकांचे रस्त्यावर अतिक्रमण अन् अतिक्रमण हटवावे तर दूसरा कुणीतरी जागा बळकावेल ही भिती .* * बळीराजा चा वाली कोण? * * गूजरी बंद.रस्तोरस्ती बाजार सुरू* चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात वर्षोनुवर्षे(तत्कालीन ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या)आता नगरवासियांच्या सोयीने स्थानिक नगरपरिषद कार्यालयासमोर चौकात दररोजच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या असलेल्या खाद्यान्न व भाजीपाला खरेदी करताना नगरवासीयांना विशेष पायपीट करावी लागू नये म्हणून दूकाने थाटून व चौकातील रिकाम्या जागी भाजीबाजार भरविण्यास परवानगी दिली होती ती आजतागायत सुरू होती मात्र संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आणि त्याचा परिणाम या मूल नगरातही झाला. सारे व्यवहार बंद करण्यात आले,तसेच भाजीबाजारही बंद करण्यात आले , काही दिवसांनी भाजीविक्री अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन भाजी विक्री सुरू झाली मात्र मूल नगरपरिषदेने आधी नगरपरिषद परिसरातील पाण्याची टाकी तोडून काढण्याचे कारण देत भाजीबाजार भरविण्यास परवानगी नाकारली व ती प्रदिर्घ काळ चालली त्यानंतर काही काळ नगरपरिषद इमारत बांधकामाचे निमि