निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना ..!
निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना...... उमेदवार आणि मतदार दोघांचीही ताकद पणाला लागणार? भाग१ दीपक देशपांडे. सध्या महाराष्ट्रात मनपा,नपा. नप.चे निवडणूक वारे जोराजोराने वाहू लागले आहेत. कुणी म्हणेल हे काय? महाराष्ट्र राज्यात वर्षभर कुठल्या ना कुठल्या निवडणूका होतच असतात ,मग यात नवीन ते काय? आम्ही तर म्हणतोय नवीन असल्याशिवाय आम्ही तो विषय चर्चेला घेतच नाही. आता या निवडणुकीत नवीन असणार आहे प्रभागांची फेररचना व सोबत असणार आहे "दाखव तुझी क्षमता" म्हणत एक प्रभाग एक उमेदवार ,एक नेतृत्व. मागील निवडणुकीत एका सक्षम उमेदवारांसोबत दूसरा नवा चेहरा वा नवखा व्यक्ती विनासायास निवडणूक लढवित विजयी होऊन जायचा ,पण आता प्रत्येक प्रभागात एक सक्षम व दमदार नेतृत्व आणि तेवढ्याच दमदार व्यक्तीला उमेदवार बनून मैदानात उतरावे लागणार आहे. या निवडणुकीत राखीव जागा देखील कमी करण्यात आल्याने टेकू घेऊन निवडून येणे सहजसाध्य राहीले नाहीये. आणि महिलांची सत्तेतील भागीदारी वाढऊन ती ५०%होणार असल्याने प्रत्येक वार्डात नेतृत्व करायला पुढे येणाऱ्या महिला आणि सक्षम नेतृत