दिवाळीचा महत्वाचा दिवस *नरकचतुर्दशी*
नरकचतुर्दशी
अश्विन कृष्ण चतुर्दशीला ।।
नरक चतुर्दशी आहे सण ।।
उठून त्या दिवशी भल्या पहाटे ।
सूर्योदयापूर्वी करावे अभ्यंगस्नान ।।
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक महत्त्वाचा सण आहे.
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.नरक चतुर्दशीचा सण आपल्याला हा संदेश देतो की, या संपूर्ण समाजाचा चांगुलपणा कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा नेहमी प्रबळ असतो.
'आली आली दिवाळी
अभ्यंगस्नान सकाळी।।'.....
राधिका देशपांडे.
https://youtu.be/KXkd05UNKMU
Comments
Post a Comment