आता कोचिंग क्लासेस ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलाखाली.

 महाराष्ट्र राज्यातील कोचिंग क्‍लासेस आता ग्राहक संरक्षण कायद्यानुसार  रडारवर 

मुंबई:-न्यूजब्युरो.
दहावी -बारावी सह इतरही स्पर्धात्मक परिक्षांचे  निकाल जाहीर होताच, टाॅपर विद्यार्थी हा आमच्‍याच क्‍लासचा असल्‍याचा दावा अनेक खासगी कोचिंग क्‍लासचालक करतात. खोट्या जाहिरातीमुळे विद्यार्थी व पालकांची फसगत होते. त्‍या पार्श्वभूमीवर आता खोट्या जाहिरात करणाऱ्या कोचिंग क्‍लासेसवर ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या अंतर्गत कारवाई होणार आहे.

.
ग्राहक संरक्षण नियामकाने कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वांवर १६ मार्चपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण नियामकाने कोचिंग संस्था, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी तपशीलवार सल्लामसलत केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे.

मार्गदर्शक तत्त्वे कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहेत. कोचिंगमध्ये गुंतलेल्या कोणालाही ते लागू होतील. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे नियमन ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार केले जाईल आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करतील.
कोचिंग संस्थांनी अशा कोणत्याही गोष्टीत गुंतू नये, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होईल किंवा ग्राहकांची स्वायत्तता नष्ट होईल. कोचिंग सेंटर्सने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कोचिंगचा सहभाग किती प्रमाणात आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे, अशा सूचना या मसुद्यात दिल्या आहेत.

कोचिंग क्लासेससाठी नियम
कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेतील यशाचा दर, निवड संख्या किंवा विद्यार्थ्यांच्या मानांकनाबाबत सत्यापित पुराव्याशिवाय खोटे दावे करू नयेत.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची कबुली न देता, विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ कोचिंग जबाबदार आहे, असे भासवू नये.

 विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी खोटी भावना निर्माण करू नये, की कोचिंग घेणे अत्यावश्यक आहे.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात काँग्रेसची प्रतिभा की काँग्रेसचा विजय?*