ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांना मरणोत्तर भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळावा.*
*ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांना मरणोत्तर भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळावा.* ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची मागणी.
बिंदुमाधव जोशी.
दीपक देशपांडे
ज्या भारत देशातील गिऱ्हाईकाला नानांनी ग्राहक बनविले,आर्थिक लुबाडणूकीपासून , फसवणुकी पासून ग्राहकतीर्थ नानांनी समस्त भारत देशातील जनतेला वाचविले, जे पीडित ग्राहकांसाठी दैवत बनले, ग्राहकांचे हक्क कुठलीही राजकीय आंदोलन न करता, जाळपोळ रक्तपात न करता, सामान्य पीडित जनतेकरिता न्याय मिळावा म्हणून ग्राहक संरक्षण कायदा निर्माण केला आणि ग्राहकाला राजा होण्याचा मान मिळवून दिला. त्या निष्काम कर्मयोद्धाला, ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी उर्फ नाना यांना मरणोत्तर पद्मश्री दिल्यास भारत देशाचे गौरवच वाढेल सोबत पद्मश्रीचi सन्मानही वाढेल.
या कारणांमुळे ग्राहक चळवळीतील साधकांनी ही मागणी उचलून धरावी,अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वसामान्य ग्राहक आणि जनतेची मागणी ,लीलाधर लोहरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, विदर्भ प्रांत सचिव यांनी शासनाकडे केली आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*
Comments
Post a Comment